ईश्वराविषयी तळमळ
मानसिक परिपूर्णत्व – १७
(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)
ईश्वरी कृपेविषयी कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही. जर माणूस प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत पोहोचेलच, हे म्हणणेही अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तो अगदी लगेचच, सहजपणे, कोणताही विलंब न लागता पोहोचेल. इथेच तुमची चूक होत आहे. तुम्ही देवासाठी पाच वर्षे, सहा वर्षे, अमुक इतकी वर्षे असा कालावधी नेमून देत आहात आणि अजूनपर्यंत कोणताच परिणाम दिसत नाही म्हणून त्याविषयी शंका घेत आहात. एखादी व्यक्ती ही तिच्या गाभ्यामध्ये प्रामाणिक असू शकते आणि तरीही तिच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्या गोष्टींमध्ये, साक्षात्कार होण्यापूर्वी परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. व्यक्ती तिच्या प्रामाणिकपणामुळे नेहमीच चिकाटी बाळगण्यास सक्षम झाली पाहिजे. कारण ईश्वरासाठीची तळमळच अशी असते की, जी कशामुळेही मावळू शकत नाही. विलंबामुळे, निराशेमुळे, कोणत्याही अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे ही इच्छा मावळता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 116-117)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026







