ऑरोविलच्या व्याख्येतच ‘सौहार्दपूर्ण वातावरण’ अंतर्भूत आहे; अशा वातावरणाचे साम्राज्य येथे प्रस्थापित होण्यासाठी पहिले पाऊल हे आहे की, ज्याने त्याने आपल्या स्वत:मध्येच संघर्ष आणि गैरसमजांचे कारण शोधले पाहिजे.

संघर्ष आणि गैरसमज ह्याची कारणे नेहमीच दोन्ही बाजूंनी असतात आणि इतरांकडून कशाची अपेक्षा करण्यापूर्वी, प्रत्येकाने स्वत:मधील त्या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी जोरकस प्रयत्न करावयास हवेत.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 201)

श्रीमाताजी