जीवनास नकार नको
जे लोक जीवनापासून निवृत्त होतात, आध्यात्मिक जीवनाच्या प्राप्तीसाठी लौकिक जीवनाचा परित्याग करतात त्यांचा मार्ग म्हणजे गूढ साधनेचा मार्ग असे मला म्हणावयाचे आहे. हे लोक लौकिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही जीवनांमध्ये फारकत करतात आणि म्हणतात “एक तर हे नाहीतर ते दुसरे.” आम्ही म्हणतो, “यात तथ्य नाही.” जीवनामध्येच आणि पूर्णपणे, समग्रतेने जीवन जगत असतांनाच व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगू शकते, जगले पाहिजे. परमोच्च चेतनेला येथे भूतलावरच आणायचे आहे.
निखळ जडभौतिक आणि प्राकृतिक दृष्टिकोनातून पाहिले असता, मनुष्य हा काही शेवटची प्रजाती नव्हे. प्राण्यानंतर जसा मानव आला तसाच मानवानंतर दुसरा जीव यायलाच हवा. आणि सर्वत्र एकाच चैतन्याचे (जाणीवशक्तीचे) अस्तित्व असल्यामुळे, तेच चैतन्य वा तीच चेतना मानवत्वाचा अनुभव प्राप्त केल्यानंतर, अतिमानवीय अस्तित्वाचा अनुभव घेईल. आणि म्हणूनच जर आपण दूर कोठेतरी जाऊ, जीवनाला सोडून देऊ, जर जीवनास नकार देऊ तर, आपली त्यासाठी कधीच तयारी होणार नाही.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 330-31)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४ - January 26, 2026







