यामुळे स्वाभाविकपणेच कर्मामध्येही मुक्तता कशी मिळवावयाची या विषयाकडे आपण येतो. कारण कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो. Read more
Posts
योगमार्गावर साधक दीर्घकाळ धीमेपणाने चाललेला असेल, तर त्याच्या हृदयाची श्रद्धा अतिप्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहू शकते; ती काही काळ दडून बसेल, पराभूत झाल्यासारखी दिसेल, परंतु पहिली संधी मिळताच ती पुन्हा प्रकट होईलच होईल. Read more
ईश्वर आणि आपले नाते निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीला म्हणजे आपण कनिष्ठ पातळीवर असताना, प्रार्थना आपली तयारी करून घेत असते. त्यावेळी ती प्रार्थना, आपल्या अहंवादी आणि आत्मभ्रांत अवस्थेशी जरी मिळतीजुळती असली तरीसुद्धा, ती त्या नात्याची पूर्वतयारी करून घेत असते; आणि कालांतराने प्रार्थनेमागे असलेल्या आध्यात्मिक सत्याकडे आपले लक्ष वळवले जाऊ शकते. Read more
योगसाधनेमध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत जेव्हा साधक जाऊन पोहोचतो तेव्हा, म्हणजे जेव्हा त्याचे मन बरेचसे शांत झालेले असते आणि जेव्हा ते स्वत:च्या मानसिक धारणांची खात्री पुरेशी आहे असे समजून प्रत्येक पावलागणिक स्वत:चेच समर्थन करत बसत नाही; जेव्हा प्राणदेखील स्थिर झालेला असतो, नियंत्रणात असतो आणि स्वत:च्या उतावळ्या इच्छेबाबत, मागण्यांबाबत व वासनेबाबत सतत हट्टाग्रही असा राहत नाही; जेव्हा शरीरतत्त्वही पुरेसे बदलले असते म्हणजे असे की, स्वत:चा बहिर्मुखपणा, अंध:कारमयता वा जडतेच्या ओझ्याखाली आंतरिक ज्योती ते संपूर्णपणे विझवून टाकत नाही; तेव्हा मग प्रदीर्घ काळपर्यंत अंतरंगात दडून असलेले अन्तरतम तत्त्व, ज्याच्या अगदी दुर्लभ अशा प्रभावातून त्याचे अस्तित्व जाणवायचे ते तत्त्व पुढे येऊ शकते आणि तेव्हा ते अस्तित्वाच्या उर्वरित अंगांना उजळवून टाकते आणि साधनेचे नेतृत्व हाती घेते. Read more
पूर्णयोगाचा साधक जीवन मान्य करीत असल्याने त्याला स्वतःचे ओझे तर वाहावे लागतेच; पण त्याबरोबर जगातीलही पुष्कळसे ओझे वाहावे लागत असते. त्याचे स्वतःचे ओझे काही कमी नसते; पण या बऱ्याचशा जड ओझ्याबरोबरच त्याला जोडून असणारे असे जगाचेही बरेचसे ओझे त्याला वाहावे लागत असते. म्हणून दुसरे योग लढ्याच्या स्वरूपाचे वाटत नसले, तरी हा पूर्णयोग मात्र पुष्कळसा लढ्याच्याच स्वरूपाचा असतो; मात्र हा लढा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नसतो; ते जणू सामुदायिक युद्धच असते आणि त्याचे क्षेत्रही मोठे असते. Read more
आमच्या साधनेची पार्श्वभूमी एका आदर्शाकडे निर्देश करते. हा आदर्श पुढील सूत्रात व्यक्त करता येईल.
ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर सर्वात्मक व सर्वातीत पुरुषाच्या जाणिवेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. Read more
Categories
Pages
- (पूर्ण) अभीप्सा – २०१८
- ०१ जानेवारी २०१८
- ०१ जानेवारी २०१९
- ०२ फेब्रुवारी २०१८
- ०२ फेब्रुवारी २०१९
- ०३ मार्च २०१८
- ०३ मार्च २०१९
- ०४ एप्रिल २०१८
- ०४ एप्रिल २०१९
- ०५ मे २०१८
- ०५ मे २०१९
- ०६ जून २०१८
- ०६ जून २०१९
- ०७ जुलै २०१८
- ०७ जुलै २०१९
- ०८ ऑगस्ट २०१८
- ०८ ऑगस्ट २०१९
- ०९ सप्टेंबर २०१८
- ०९ सप्टेंबर २०१९
- १० ऑक्टोबर २०१८
- १० ऑक्टोबर २०१९
- ११ नोव्हेंबर २०१८
- ११ नोव्हेंबर २०१९
- १२ डिसेंबर २०१८
- १२ डिसेंबर २०१९
- HomePage
- अन्य लिंक्स
- अभीप्सा – २०१८
- अभीप्सा – २०१९
- अभीप्सा मासिकाची भूमिका
- तत्त्वज्ञान
- दर्शन दिन संदेश – 03
- दर्शन दिन संदेश – १९५८
- प्रतीक आणि त्याचा अर्थ
- माताजींचा हात सोडू नकोस
- मुख्य-लिंक्स
- व्यावहारिक जीवन
- श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रथम भेटीचा अन्वयार्थ
- श्रीअरविंद यांची ग्रंथसंपदा
- श्रीअरविंद यांचे उत्तरपारा येथील भाषण
- श्रीअरविंदांचा अल्प परिचय
- श्रीमाताजींचा अल्प परिचय
- श्रीमाताजींची ग्रंथसंपदा
- संकलित ग्रंथ संपदा
- संपर्क
- समाधी दर्शन
- साधना