(सप्टेंबर १९०९)
…भारतभरातील जे युवक आज एका मार्गाच्या शोधात आहेत, कार्य करण्यासाठी धडपडू पाहत आहेत, त्यांना या भावावेगावर स्वार होऊ द्या आणि शक्तिसंपादन करण्याची साधने शोधून काढू द्यात. जे उदात्त कार्य आपल्याला सिद्धीस न्यावयाचे आहे ते कार्य केवळ भावावेगाने साध्य होणार नाही, तेथे सामर्थ्याची आवश्यकता आहे. तुमच्या पूर्वजांच्या शिकवणुकीतून प्राप्त होऊ शकेल अशा शक्तीच्या आधारे, ‘असाध्य ते साध्य’ होऊ शकेल. ती ‘शक्ती’ तुमच्या शरीरामध्ये उतरू पाहण्याच्या तयारीत आहे. ती शक्ती म्हणजे साक्षात ‘माता’च होय. तिला शरण जायला शिका. तुम्हाला साधन म्हणून उपयोगात आणून ती दिव्य ‘माता’ ते कार्य इतक्या त्वरेने आणि इतक्या सामर्थ्याने पूर्णत्वाला नेईल की, त्यामुळे जग आश्चर्यचकित होऊन जाईल. या शक्तिविना तुमचे सारे प्रयत्न धुळीस मिळतील. आता जर तुमच्या हृदयांमध्ये मातेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना झालीच आहे, तुम्हीही तिची सेवा करावयास शिकले आहात आणि तिची उपसना करत आहात, तर आता तुमच्या अंतरंगातील मातेला समर्पित व्हा. कार्यपूर्तीचा अन्य कोणताच मार्ग नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 222-223)