आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१५)
व्यक्तीला जेव्हा सामान्य नोकरीव्यवसायात आणि सामान्य परिस्थितीमध्ये राहून जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यक्तीने संपूर्ण समत्व व अनासक्ती बाळगली पाहिजे; तसेच ‘ईश्वर’ आहे आणि आत्ता जरी सर्व गोष्टी ‘अज्ञान’मय जगताच्या परिस्थितीमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्येसुद्धा ‘ईश्वरी संकल्प’ कार्यकारी आहे या श्रद्धेनिशी व्यक्तीने भगवद्गीतेमधील समता-भावाची जोपासना केली पाहिजे. याच्यापलीकडे (या अज्ञानमय जगताच्या पलीकडे) ‘प्रकाश’ आणि ‘आनंद’ आहेत आणि त्यांच्याप्रत जाण्यासाठी जीवन कार्यरत आहे. व्यक्तीमधील आणि तिच्या प्रकृतीमधील त्यांच्या आगमनासाठीचा आणि त्यांच्या सुस्थिर होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिने या समत्वामध्ये स्वत:ला वृद्धिंगत करत नेले पाहिजे. त्यामुळे असुखकर, असहमत गोष्टींविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असुखदतेला समता-भावाने सामोरे गेले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 344)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025