मनावर नियंत्रण
अमृतवर्षा ०६
सद्यकालीन विश्वात सामान्य मानवी जीवन मनाच्या आज्ञेनुसार वागते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण पुढील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.
सहसा एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु अखेरीस त्या एका वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली प्रक्रिया, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया आहे. निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व या त्या चार प्रक्रिया आहेत. अनिष्ट मनापासून सुटका करून घेण्यासाठी हे सारे करायचे असते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 183]
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ३० - February 14, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २९ - February 13, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २८ - February 12, 2026






