श्रद्धेतून समत्व
आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ अपयश आलेले दिसत असले तरीही, तो ‘ईश्वरी संकल्प’ आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून, त्या अंतिम साक्षात्काराकडेच घेऊन जात आहे, अशी श्रद्धा आपण बाळगली पाहिजे. ही श्रद्धा आपल्याला समत्व प्रदान करेल; आणि ही श्रद्धाच, जे काही घडते ते अंतिम स्वरूपाचे नसून, मार्गावर वाटचाल करत असताना, या सर्व गोष्टींमधून जावेच लागते, या गोष्टीचा स्वीकार करते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 91)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४७ - December 15, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४६ - December 14, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025






