समत्व म्हणजे नवे अज्ञान किंवा आंधळेपण नव्हे; समत्व हे दृष्टीमध्ये धूसरता आणण्याची तसेच सर्व रंगामधील भिन्नता पुसून टाकण्याची अपेक्षा बाळगत नाही किंवा त्याची आवश्यकताही नसते. विभिन्नता असणारच आहे, अभिव्यक्तीमध्ये वैविध्यही असणार आहे आणि त्याची आपण कदर केली पाहिजे. आपली दृष्टी जेव्हा आंशिक तसेच चुकीच्या प्रेमाने व द्वेषाने, प्रशंसेने व तिरस्काराने, सहानुभूती व विरोधी भावनेने आणि अनुकूल व प्रतिकूल भावनेने मलीन झालेली होती त्यापेक्षा, आपण आता (समत्व दृष्टीच्या साहाय्याने) त्या विविधतेची अधिक न्याय्य प्रकारे कदर करू शकू. मात्र या विविधतेच्या पाठीमागे असलेल्या आणि जो त्या विविधतेमध्ये निवास करतो त्या ‘परिपूर्ण’ आणि ‘अपरिवर्तनीय’ ईश्वरास आपल्याला नेहमीच पाहता आले पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव व्हावयास हवी, आपल्याला त्याचे ज्ञान व्हावयास हवे. किंवा जर तो ईश्वर आपल्यापासून गुप्त असेल तर किमान – आपल्या मानवी मापदंडांना विशिष्ट आविष्कार हा सुसंवादी व परिपूर्ण वाटतो की ओबडधोबड आणि अपूर्ण की अगदी मिथ्या व अनिष्ट वाटतो, यास महत्त्व न देता – त्या विशिष्ट आविष्काराची ईश्वरी आवश्यकता आणि त्या पाठीमागे असणाऱ्या सुबुद्ध प्रयोजनावर तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 224-225)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १७ - September 24, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १५ - September 22, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १२ - September 19, 2023