समत्व आणि स्थिरतेचा दृढ पाया
उच्चतर चेतनेची शांती जेव्हा अवतरित होते तेव्हा ती नेहमीच तिच्यासोबत समतेची प्रवृत्ती देखील घेऊन येते. कारण कनिष्ठ प्रकृतीच्या लाटांकडून, समतेविना असलेल्या शांतीवर आघात होण्याचा नेहमीच धोका संभवतो.
*
मानसिक चेतनेप्रमाणेच तुम्ही प्राणिक आणि शारीरिक चेतनेमध्येही समत्व आणि स्थिरतेचा दृढ पाया निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तुमच्यामध्ये ‘शक्ती’ आणि ‘आनंदा’चा पूर्ण प्रवाह अवतरित होऊ दे, परंतु तो प्रवाह धारण करता येईल अशा दृढ आधारामध्येच शक्ती आणि आनंद अवतरित व्हायला हवेत. आणि आधाराच्या (शरीर, प्राण, मन) ठायी ही क्षमता आणि दृढता परिपूर्ण समत्वामधूनच येते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 128, 127)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आपल्याला काय संपादन करायचे आहे? - July 26, 2026
- आपले कार्य काय? - July 25, 2026
- विचार-कणिका - July 24, 2026





