प्रामाणिकपणा – २३

लोक जेव्हा मला म्हणतात की, “त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही.” तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ते प्रामाणिक नसतात. कारण जगातील कोणत्याही इच्छांपेक्षा प्रामाणिकपणा ही अधिक बलशाली शक्ती आहे. प्रामाणिकपणा कोणत्याही गोष्टीत निमिषार्धातच बदल घडवून आणू शकतो, तो त्या इच्छेला पकडतो, तिचा ताबा घेतो, तिला बाहेर ओढून काढतो आणि मग ती इच्छा संपून गेलेली असते. पण तुम्ही मात्र डोळेझाक करता आणि तुमच्या (इच्छावासनांसाठी) सबबी शोधून काढता.

– श्रीमाताजी [CWM 08 : 19]

श्रीमाताजी