कर्म आराधना – ४१
ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच जबाबदारी आहे, असे तुम्हाला वाटता कामा नये.
कोणत्याच गोष्टीविषयी वा जीवनशैलीविषयी, कोणतीही ‘आसक्ती’ असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तुम्हाला खराखुरा योगिक दृष्टिकोन हवा असेल तर, ‘ईश्वरा’कडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्याच सहजतेने आणि कोणत्याही पश्चात्तापाविना त्या गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. ”मला काहीही नको,” असे म्हणणाऱ्या एखाद्या संन्याशाचा दृष्टिकोन आणि ”मला अमुक एक गोष्ट हवी आहे,’ असे म्हणणाऱ्या प्रापंचिक माणसाचा दृष्टिकोन, हे दोन्ही दृष्टिकोन एकसारखेच असतात. प्रापंचिक जीवन जगणारा माणूस जेवढा त्याच्या मालकीच्या गोष्टींबाबत आसक्त असतो, तेवढाच एखादा संन्यासीसुद्धा त्याच्या परित्यागाविषयी आसक्त असू शकतो.
– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025