कर्म आराधना – ३६

कर्म करत राहिल्यामुळे आंतरिक अनुभूती आणि बाह्य विकास यांच्यामध्ये संतुलन राखण्यास मदत होते; तसे न केल्यास, एकांगीपणा निर्माण होण्याची आणि प्रमाणबद्धता व संतुलनाची कमतरता वाढीस लागण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी देखील कर्मसाधना करणे आवश्यक असते, कारण सरतेशेवटी, त्यामुळेच बाह्य प्रकृतीमध्ये आणि बाह्य जीवनामध्ये, आंतरिक प्रगती आणणे साधकाला शक्य होते आणि त्यामुळेच साधनेच्या समग्रतेस मदत होते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 240]

श्रीअरविंद