‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अलिपूरच्या कारावासात असताना अरविंद घोष यांनी ‘गीता’प्रणीत योगमार्गाची साधना केली आणि उपनिषदांच्या साहाय्याने ध्यान केले. केवळ याच ग्रंथांमधून त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांना कोणता एखादा प्रश्न पडला वा अडचण भेडसावली तर ते गीतेकडे वळत असत आणि बहुतेक वेळा त्यांना त्यातून उत्तर वा साहाय्य मिळत असे.
कारावासामध्ये असताना, एकांतात त्यांची जी ध्यानसाधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा त्यांना सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे, त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट, मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी त्यांच्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सागंण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली होती.
विवेकानंदांनी आपल्याला अंतर्ज्ञानात्मक स्तर दाखवून दिला आणि त्यासंबंधी प्रशिक्षण दिले असे श्रीअरविंद यांनी पुढे एकदा शिष्यवर्गाशी बोलताना सांगितले होते. (क्रमश:)
- प्राणशक्ती – उपयुक्त की विघातक? - February 15, 2025
- रूपांतरणाचे प्रकार – प्रास्ताविक - February 4, 2025
- रूपांतरणाचे प्रकार – प्रास्ताविक - February 2, 2025