साधनेची मुळाक्षरे – १५
प्रश्न : मनामध्ये चालणाऱ्या चर्चा कशा थांबवाव्यात?
श्रीमाताजी : पहिली अट म्हणजे शक्य तितके कमी बोला.
दुसरी अट अशी की, तुम्ही आधी काय केले आहे किंवा काय करायचे आहे याचा विचार न करता, तुम्ही ज्या क्षणाला जे करत आहात केवळ त्याच गोष्टीचा विचार करा. भूतकाळाबद्दल खेद करत बसू नका किंवा भविष्य काय असेल याची कल्पना करत बसू नका.
तुम्ही तुमच्या विचारांमधील निराशावादाला आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 141)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- विरोधी शक्ती - November 13, 2023
- आध्यात्मिक जीवनाची तयारी - November 12, 2023
- मूलगामी प्रश्नमालिका - November 11, 2023