व्यक्तीला जर ‘प्रकृती’शी संवाद साधता आला, तर व्यक्ती जीवनातील थोडीफार रहस्ये शिकू शकते, ती रहस्ये तिला खूप उपयोगी ठरू शकतात. व्यक्तीला त्यामुळे केवळ आजारपणाची पूर्वसूचनाच मिळते असे नाही तर, व्यक्ती त्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकते, किंवा येणारी आपत्ती टाळू शकते आणि ‘प्रकृती’चा विनाश टाळू शकते. अशा प्रकारे, त्याचे अनेक फायदे आहेत. संवाद साधायचा म्हणजे काय? तर सर्व अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या ‘सुसंवादाच्या आनंदा’तील ज्ञान शोधून काढणे आणि त्याच्या चेतनेने स्पंदित होणे. ही गोष्ट खरोखरच शोध घेण्यायोग्य आहे. हे आयुष्यभर करण्याचे कार्य आहे. या चेतनेचा शोध घ्या आणि या सूक्ष्म जगताशी सुसंवाद साधण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. व्यक्ती शांततेमध्येच सुसंवाद साधू शकते आणि एक प्रकारच्या सूक्ष्म देवाणघेवाणीने स्वतःला अभिव्यक्त करते. ती अगदी पूर्णतया स्वतंत्र अशी भाषा आहे की जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणे शक्य नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करत असतो. तर ती स्वतंत्र भाषा म्हणजे एक लघु आणि अचूक अभिव्यक्ती असते आणि आपल्या भाषेपेक्षा ती कितीतरी अधिक प्रमाणात आकलन होण्यायोग्य असते.
– श्रीमाताजी
(Throb of Nature : 04)
- आध्यात्मिकता आणि नैतिकता यातील फरक - November 29, 2023
- विरोधी शक्ती - November 13, 2023
- आध्यात्मिक जीवनाची तयारी - November 12, 2023