विचार शलाका – २८
सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने आपली कर्मं आणि आपले जीवन ‘ईश्वरा’ला समर्पित केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगातील ‘दिव्य’ शांतीसाठी त्या ‘ईश्वरा’ची प्रार्थना केली पाहिजे. मन जेव्हा शांत, स्थिर होते तेव्हा, ‘दिव्यमाता’च आपल्या जीवनाला आधार देत आहे असे व्यक्ती अनुभवू शकते आणि तेव्हा मग ती व्यक्ती सर्वकाही त्या ‘दिव्यमाते’च्या हाती सोपवून देते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 345)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आध्यात्मिक तपस्या - December 2, 2023
- द्वंद्वातीतता आणि आध्यात्मिकता - December 1, 2023
- आध्यात्मिकतेचा गाभा - November 28, 2023