लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा आणि दुखावलेल्या भावनांनिशी व्यक्तीचा अहंकारच स्वत: बाहेर उफाळून येतो आणि त्यामुळे विसंवाद अधिकच वाढीस लागतो. ईश्वराचे विभिन्न व्यक्तींबाबत विविध पद्धतीने कार्य चालू असते, हे अहंकाराला कधीच उमगत नाही आणि व्यक्तीने स्वतःच्या अहंकारी दृष्टिकोनातून गोष्टींचे मूल्यमापन करणे, ही एक अशी मोठी चूक असते की ज्यामुळे, गोंधळच वाढीला लागतो. आपण आवेगाने आणि असहिष्णुतेने जे जे काही करतो ते ईश्वरी असू शकत नाही कारण ‘ईश्वर’ शांती आणि सुसंवादामध्येच कार्य करतो.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 279)
- विरोधी शक्ती - November 13, 2023
- आध्यात्मिक जीवनाची तयारी - November 12, 2023
- मूलगामी प्रश्नमालिका - November 11, 2023