…व्यक्ती ज्याला सारे काही सांगू शकेल, ज्याच्यासमोर सारे काही उघड करू शकेल असा तो ईश्वरच व्यक्तीचा सर्वोत्तम मित्र असू शकत नाही का? कारण खरोखरच तोच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, पुन्हा पुन्हा केल्या नाहीत तर, साऱ्या चुका दूर करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो; जो सर्व जाणू शकतो, साऱ्यावर उपाय करू शकतो आणि जो मार्गावर नेहमीच साहाय्य पुरवितो. तुम्ही अपयशी होऊ नये, तुम्ही डळमळू नये, कोलमडू नये आणि तुम्ही तुमच्या ध्येयाप्रत सरळ चालत राहावे यासाठी साहाय्य करणाराही तोच असतो. तोच खरा मित्र असतो, तुमच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्येदेखील तो तुमचा साथी असतो, तोच तुम्हाला जाणून घेऊ शकतो, तुम्हाला बरे करू शकतो आणि तुम्हाला जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तोच तुमच्यासोबत असतो. तुम्ही जेव्हा त्याला अगदी प्रामाणिकपणे हाक मारता तेव्हा, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला कवेत घेण्यासाठी आणि तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासाठी तो नेहमीच उपस्थित असतो.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)
- आत्म-निवेदन कसे असावे? - May 25, 2022
- पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण - May 24, 2022
- आत्मदान आणि आत्मनिवेदन - May 23, 2022