मृत्युबद्दल शोक करण्यासारखे काहीच नाही कारण मृत्यू म्हणजे केवळ एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यासारखे आहे – की कदाचित जिथे तुम्ही बरेचदा गाढ झोपेमध्ये असताना जात असता.
*
… मृत्यू म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची समाप्ती नव्हे तर मृत्यू म्हणजे केवळ देह सोडणे होय, हे खरे वास्तव आहे. माणसाचा मृत्यू होत नाही कारण तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जातो आणि तेथील वातावरणानुसार कपडे बदलतो.
*
जे काही घडले आहे त्याचा आता शांतपणे स्वीकार केला पाहिजे कारण घटना घडून गेली आहे. मानवी दृष्टीला – जी फक्त वर्तमान व बाह्य दृश्यच पाहत असते तिला – ते चांगले वाटले नाही तरी आत्म्याच्या एका जीवनाकडून दुसऱ्या जीवनाकडे होणाऱ्या वाटचालीसाठी तेच सर्वोत्तम असते. अध्यात्म-साधकासाठी मृत्यू म्हणजे जीवनाच्या एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडे जाणारा फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून कोणाचा मृत्यू झालेला नसतो, तर ते केवळ प्रस्थान आहे; या दृष्टीने मृत्युकडे पाहा…
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529)
- श्रीमाताजी आणि समीपता – ३० - June 19, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २८ - June 17, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २७ - June 16, 2025