समर्पण ५६

प्रश्न : ‘ईश्वरा’प्रत समर्पण केल्याचा साधकाने जो निश्चय केलेला असतो त्याचा, त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काही परिणाम झाला आहे, हे दर्शविणारे लक्षण कोणते ?

श्रीमाताजी : समर्पणाच्या निश्चयातून काही विशिष्ट असे परिणाम दिसून येतात, असे श्रीअरविंद म्हणतात. पहिला परिणाम म्हणजे कोणताही प्रश्न उपस्थित न करता, अगदी सहजतेने (ईश्वराचे) आज्ञाधारक बनणे आणि दुसरा परिणाम म्हणजे, ‘ईश्वरा’च्या प्रभावाखेरीज इतर सर्व प्रभाव नाकारण्याची शक्ती असणे. हे फार मोठे परिणाम आहेत. एखाद्या व्यक्तीने जर या गोष्टी साध्य केलेल्या असतील तर, ती व्यक्ती आधीपासूनच बऱ्यापैकी प्रगत दशेत आहे, असे समजावे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 129)