समर्पण ५५
समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू झालेली असली तरीदेखील, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वरी अस्तित्व’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते – त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आत्म-प्राप्ती हेच रहस्य - May 17, 2022
- ईश्वरी कृपा आणि समर्पण - May 13, 2022
- ईश्वरी कृपा – एक मुक्त पुष्प - May 12, 2022