मानसिक परिपूर्णत्व – १३
श्रद्धा ही कोणत्याही अनुभवावर अवलंबून असत नाही. ती अशी गोष्ट आहे की जी अनुभवपूर्व असते. व्यक्ती योगसाधनेला सुरुवात करते ती अनुभवाच्या बळावर नाही, तर ती सहसा श्रद्धेच्या बळावर सुरुवात करते. हे केवळ योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच आहे असे नाही; तर सामान्य जीवनात सुद्धा हेच लागू पडते. कार्यकर्ते, संशोधक, ज्ञाननिर्माते सुरुवात करतात ती श्रद्धेनेच आणि जोपर्यंत पुरावा सापडत नाही, किंवा ती गोष्ट घडून येत नाही तोपर्यंत निराशा आली, अपयश आले, विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच काहीतरी त्यांना सांगत असते की, यामध्ये तथ्य आहे, या गोष्टीचे अनुसरण केले पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. आंधळी श्रद्धा ही चुकीची गोष्ट नाही का, असे रामकृष्णांना विचारले असताना ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे आंधळी श्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर आंधळीच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती किंवा स्थापित झालेले ज्ञान असते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 92-93)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023