मानसिक परिपूर्णत्व – ०९
दोन शक्यता असतात. एक म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या दवारे शुद्धीकरण, पण याला बराच कालावधी लागतो. दुसरी शक्यता म्हणजे ईश्वरी कृपेने त्यामध्ये थेट हात घालणे, ही कृती सहसा अधिक जलद असते. या दुसऱ्या गोष्टीसाठी संपूर्ण समर्पण, आत्मदान यांची आवश्यकता असते. आणि त्यासाठी पुन्हा कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे, ईश्वरी शक्तीस कार्य करू देईल इतपत, बऱ्यापैकी शांत राहू शकेल अशा मनाची ! प्रत्येक पावलागणिक संपूर्ण एकनिष्ठ राहून, ईश्वरी शक्तीकार्यास साहाय्यकारी ठरेल असे मन असले पाहिजे, अन्यथा त्याने किमान स्थिर व शांत तरी राहिले पाहिजे. रामकृष्णांनी ज्या मांजरीच्या पिल्लासारख्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला होता, त्या दृष्टिकोनाशी मिळतीजुळती अशी ही दुसरी अवस्था असते. ज्या व्यक्तींना, त्या जे काही करत असतात त्यामध्ये विचार आणि इच्छेच्या द्वारे खूप गतिशील हालचालींची सवय झालेली असते अशा व्यक्तींना या गतिविधी स्थिर करणे आणि मानसिक आत्मदानाची शांतता आत्मसात करणे अवघड जाते. त्यांना योगसाधना करता येणार नाही किंवा ते आत्मदानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा याचा अर्थ नाही; मात्र शुद्धीकरण आणि आत्मदान पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांना अधिक कालावधी लागतो; तेव्हा अशा व्यक्तींकडे धीर, स्थिर प्रयत्नसातत्य आणि सर्व गोष्टींच्या पार जाण्याचा निश्चय हवा, असा याचा अर्थ होय.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023