मानवी एकतेतून शांती
एकसारखेपणातून एकता हा खुळचटपणा आहे. अनेकांच्या युतीमधून एकता प्रत्यक्षात उतरावयास हवी. प्रत्येक जण त्या एकतेचा एक भाग असेल; प्रत्येक जण त्या ‘पूर्णा’साठी अपरिहार्य असेल.
*
प्रत्येक मनुष्याकडे त्याचा स्वत:चा उपाय असतो, परंतु तीच मोठी समस्या असते. प्रत्येकाकडे स्वत:चा असा उपाय असला तरी सत्यामध्ये जीवन व्यतीत करावयाचे असेल तर, हे सर्वच उपाय एकत्रितपणे काम करू शकतील, असा काही (समन्वयकारी) मार्ग आपण शोधला पाहिजे.
म्हणून ही रचना अत्यंत व्यापक, अतिशय लवचीक असली पाहिजे. आणि सर्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सद्भावना असली पाहिजे : ती पहिली अट आहे – पहिली वैयक्तिक अट – सद्भावना. दर क्षणी सर्वोत्तम तेच करण्यासाठी प्रत्येकाने पुरेसे लवचीक असले पाहिजे.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 202), (CWM 13 : 311)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- तारुण्य आणि वार्धक्य - June 24, 2026
- शाश्वत तारुण्याचा आश्रय - June 23, 2026
- तारुण्य म्हणजे काय? - June 21, 2026






