आपल्याला जीवन परिवर्तित करावयाचे आहे. आपल्याला त्यापासून पळून दूर जावयाचे नाही… ज्याला देव म्हणतात त्याला जाणून घेण्याचा, त्याच्या सान्निध्यात येण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी त्यांनी जीवनाचा त्याग केला आहे. ते असे म्हणतात, ‘जीवन हे आध्यात्मिक प्रगतीत एक अडथळा आहे. ईश्वरप्राप्तीकरता जीवनाचा त्याग करायलाच हवा.” म्हणून, तुम्हाला भारतात सर्वसंग परित्याग केलेले संन्यासी दिसतात; युरोपमध्ये भिक्षु आणि तपस्वी दिसतात. ठीक आहे, ते तात्पुरती सुटका करुन घेऊ शकतात. पण तरी, जेव्हा त्यांचा पुन्हा जन्म होतो तेव्हा त्यांना पुन्हा पहिल्यापासून सगळ्याची सुरुवात करावी लागते. जीवन आहे तसेच राहते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 333-334)