श्रीमाताजी : पालक, वातावरण आणि परिस्थिती यांमुळे ज्याची घडण होते ते बाह्य अस्तित्व म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्व हे पुनर्जन्मामध्ये नव्याने जन्माला येत नाही; तर चैत्य पुरुष हा एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये संक्रमित होत जातो. त्यामुळे, तर्कदृष्ट्या विचार केला तर, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाला गत जन्मांचे स्मरण असू शकत नाही किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते किंवा या वा त्या व्यक्तीचे जीवनमान कसे होते, ह्याचे स्मरण असू शकत नाही. फक्त चैत्य पुरुषालाच त्याचे स्मरण असू शकते; आणि त्यामुळे, आपल्यामध्ये गत जन्मांचे नेमके कोणते ठसे उमटले आहेत हे, आपल्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झाल्यावरच आपल्याला समजू शकते. पण खरेतर, आपण गत जन्मांमध्ये काय होतो यावर आपले लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, आपल्याला काय बनायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.
– श्रीमाताजी
(CWM 15 : 124)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १४ - September 21, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १३ - September 20, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ११ - September 18, 2023