पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट
प्रश्न : माताजी, आपण पुनर्जन्मावर विश्वास का ठेवतो?
श्रीमाताजी : ज्यांना गत जीवनांचे स्मरण आहे त्यांनी पुनर्जन्म ही वस्तुस्थिती असल्याचे घोषित केले आहे. आत्ताच्या देहामध्ये असलेली ही चेतना, याआधीच्या जन्मांमध्ये इतर देहांद्वारेही अभिव्यक्त झालेली होती आणि या देहाच्या अंतानंतरही ती टिकून राहणार आहे, हे जाणण्याइतपत ज्यांच्या आंतरिक चेतनेचा विकास झाला आहे, असे आजवर पुष्कळ जण होऊन गेले आणि अजूनही आहेत. ‘पुनर्जन्माचा सिद्धान्त’ चर्चा करत बसावी असा विषय नाही, तर ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी तो वादातीत असा विषय आहे.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 400)
*
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १२ - January 24, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ११ - January 23, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १० - January 22, 2026






