आजारपणाला सामोरे जाताना
श्रीअरविंद एका साधकाला पत्रात लिहितात की, शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला बरे व्हायचे असेल तर, त्यातील मुख्य अडथळा म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्राणिक हालचाली. तुमच्या स्वतःच्या कल्पना, दावे, अग्रक्रम यावर अहंयुक्त भर – तुमच्या स्वतःच्या नीतिपरायणतेबद्दलची तुमची प्रौढी आणि दुसऱ्या बाजूला इतरांचा दुष्टपणा, तक्रारी, भांडणे, वादविवाद, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांविषयीचा द्वेष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया – ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या यकृतावर, पोटावर व नसांवर परिणाम झाला आहे.
जर तुम्ही या साऱ्या गोष्टी सोडून द्याल आणि शांतपणे जगाल, इतरांबरोबर शांतिपूर्ण रीतीने जगाल, स्वतःविषयी आणि इतरांविषयी कमी विचार करत आणि ईश्वराचा जास्त विचार करत जगाल तर, गोष्टी अधिक सोप्या होतील आणि तुमची तब्येत सुधारण्यास मदत करतील. आजारपणाला सामोरे जाताना, मनाची शांतचित्तता देखील आवश्यक आहे. कारण मनाची चलबिचल शक्तीचे कार्य थांबविते.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579)
- नैतिक शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत - June 16, 2026
- संन्यासाश्रम - May 31, 2026
- वानप्रस्थाश्रम - May 30, 2026






