तुम्हाला आठवते का, ती प्रचंड वादळाची रात्र ? विजांचा, ढगांचा मोठाच गडगडाट चालू होता, पावसाच्या माऱ्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मला वाटले की, श्रीअरविंदांच्या खोलीत जावे आणि खिडक्या बंद करण्यास त्यांना मदत करावी. मी दार उघडून आत गेले तेव्हा पाहते तो काय? श्रीअरविंद अगदी शांतपणे त्यांच्या टेबलावर काहीतरी लिहीत बसले होते. तिथे त्या खोलीमध्ये एवढी सघन शांती होती की, बाहेर एवढे वादळ घोंघावत आहे याची कोणी कल्पनाही करू शकले नसते.

– श्रीमाताजी

अभीप्सा मराठी मासिक