देवाची नामी व्यवस्था
श्रीअरविंद त्यांच्या आजीआजोबांविषयीची एक गोष्ट सांगत असत.
त्यांची आजी एकदा म्हणाली, “देवाने हे इतके वाईट जग का बनविले आहे? मी जर त्याला भेटू शकले तर तो भेटल्यावर त्याच्याविषयी मला काय वाटते ते मी त्याला सांगणार आहे.”
त्यावर आजोबा म्हणाले, “हो बरोबर आहे. पण देवाने अशी नामी व्यवस्था करून ठेवली आहे की, जोवर तुमच्यामध्ये अशा व इतर प्रकारच्या कोणत्याही इच्छा शिल्लक आहेत तोवर तुम्ही त्याच्याजवळ जाऊच शकत नाही.”
– श्रीअरविंद
(Evening talks with Sri Aurobindo)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- पूर्णयोगासाठी आवश्यक असणारी तयारी - September 16, 2026
- दिव्य-सत्याचा शोध - September 15, 2026
- चैत्य पुरुष खुला होणे - September 12, 2026






