एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली नाही तर ते कुंठित होऊन जाते; ते मिळेनासेदेखील होते. एवढेच नाही, तर त्यात जे जे भरलेले आहे तेही बिघडून जाते.
यापेक्षा जर, प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपल्या किरकोळ व्यक्तित्वाने त्या महान वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला कसे जोडून घ्यावयाचे हे जर त्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 102)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025