एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली नाही तर ते कुंठित होऊन जाते; ते मिळेनासेदेखील होते. एवढेच नाही, तर त्यात जे जे भरलेले आहे तेही बिघडून जाते.

यापेक्षा जर, प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपल्या किरकोळ व्यक्तित्वाने त्या महान वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला कसे जोडून घ्यावयाचे हे जर त्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 102)

श्रीमाताजी