आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्याच्या’ महान अशा तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला सत्यसूर्याप्रत, परमप्रकाशाप्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. त्यांनी असे सांगितले आहे की : ”तुमची हृदये करूणेने भरून जाऊ देत, आणि त्यानंतर, दुःखपीडेने छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा, प्रशिक्षक व्हा, आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप पेटवा.”

– श्रीमाताजी
(CWM 02 : 29)

Latest posts by श्रीमाताजी (see all)